May 01, 2010

सवाल लाखांचा आहे ना?

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याची पहिली सुमारे सतरा-अठरा वर्षे व्यक्तित्वाच्या घडणीच काळ असतो. या काळातील त्याला मिळणारे "संगोपन, अध्ययन, दिशाभिमुखता (orientation) पर्यावरण (नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक राजकीय)" ही त्यास कारणीभूत असतात. पारिस्थिकी (ecology) व उर्जा (energy) ही दोनही पर्यावरणाची अंगे असतात. ही स्थिती त्या व्यक्तीच्या पुढच्या आयुष्याची दिशा पण ठरवतात. यानंतरच्या काळात व्यक्तिमत्व (personality) घडते; जसे नवीन कौशल्य / नैपुण्य (skills) व माहिती (information) जमा करणे. याची दिशा पण हा घडणीचा काळच ठरवतो.

याचे एकच उदाहरण पुरे:
वियेतनाम येथे विसाव्या शतकात बरीच वर्षे युघ्द चालले. या काळात एक पिढी बेचिराख झालेल्या युध्दभूमीवर जन्माला आली, वयात आली व बंदूक हातात घेऊन युघ्दात सामील झाली.

मुंबईत (व इतर शहरात) एक-दोन पिढ्या झोपडपट्टीत व रस्त्याकडेस जन्मास आल्या व वाढलेल्या लेखकाने पाहिल्या. त्या फक्त लोकसंख्येच्या आकडेवारीत जमा झाल्या: एक निशब्द युध्द चालू राहिले, कसलाही आवाज न करता. त्यांची वसती आता मुंबईत साठ टक्के आहे असं म्हणतात. इथे अधून मधून आतंक, अतिरेक, दंगली इत्यादींचे स्फोट होत असतात. अर्थातच यामागे धनवानच असणार! या विस्थापितांची पुढची दिशा कोणती?

सद्या दूरचित्रवाणीवर "Indian Idol" दाखवत आहेत. शहरा-शहरांतून हजारो उमेदवार रांगा-रांगांत आपला नंबर लागेल या आशेने उभे असलेले दिसतात. काही यौवनावस्थेत, काही पोक्त आहेत. .
मुंबईच्या झोपडपट्टीत सुमारे १२ - १५ लाख मुले असतील.

"घडणीच्या काळात" या सर्वांचे "संगोपन, अध्ययन, दिशाभिमुखन पर्यावरण" कोणत्या अवस्थेत झाले असेल?
शासक, प्रशासक, प्रव्यवसायिक किंवा अनु मलिक आणि कंपनीला याचा विचार करायला वेळ कुठे? सवाल लाखांचा आहे ना?

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment